वारणा ज्ञानपीठ ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत......

Saturday, 9 December 2017

स्लॅमबुक .........भाग २-३

स्लॅमबुक .........भाग २-३
काय मिळणार आहे ?
चांगल्या मार्क पडल्या शिवाय काय मजा नाही?
नाही तर अलीकडे मुलींना बारावीला चांगले मार्क नाही पडले तर लग्न लावून देण्याच्या मानसिकते पूर्वी...........
आमच्या कडं दोन हजार पाच दरम्यान पोराला बारावीला मार्क कमी पडले तर म्हशी करून देण्याचं बेकार फॅड होतं. थोडक्यात डायरेक्ट शेण भरायचं काम.?
आणि अश्यातच हे पोरांना सारखं सांगत असल्यामुळे.......
पोरांनी पण माझी हौसचं भागवली.......
पाच -सात प्रियजनांनी-जणींनी लिहिलेली माझी स्लॅमबुक वही पोरांनी कुठं कधी फेकली मलाच कळलं नाही.आणि मुलींना पुन्हा आटोग्राफ मागणं शक्य नव्हतं कारण परीक्षा चार दिवसावर आली होती.त्यामुळे जोशी सोबतच्या विचारामुळे मी पण मुलींना वेळ काढा ?
असं म्हणून स्वाभिमान घाण टाकला नाही?

झालं सर्व जण परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी देवीच्या पाया पडण्यासाठी व पेनं, पॅड ,पट्टी घेण्यासाठी बाहेर पडले.त्याठिकाणी परीक्षेला शुभेच्या ,इंग्रजीच्या ट्युशनला सरावात चांगले मार्क पडलेल्या पोरी-पोरांना त्यादिवशी भाव यायला लागला.

त्यात पोरा-पोरींचे उत्तरं अशी होती........
....अरे बाबा मलाच लिहायला वेळ पुरत नाही ,तुला कधी सांगू?
.....पाहूया वेळ भेटला तर.....?
.......सरांची हालचाल पाहून खुणा करून देईन.......?
......काळजी करू नको मी हाय?


अश्या आश्वासनांची देवीच्या मंदिरातील सभेची समाप्ती झाली. तरी राम्या,मामु,पम्या यांची मानसिकता अभ्यासाची नव्हती.
काय बघितलं आमच्या मांणसायनी आमच्यात???
हा दोघे एकाच कॉलेजला ded
करणार बघत रहा?
प्रॅक्टिकल आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या आधारे मी कसा ऐंशीचा आकडा गाठणार ही संध्याकाळी चर्चा झाली.आणि व्ही.आय.पी. प्रश्न वाचण्यात रात्रीचे दोन वाजले..
रात्री पॅड,पट्टी,जुळवा जुळवाजुळव करून पॅडवर हॉलतिकीट लावून जो तो....

उद्या सकाळी अंघोळ केलो की निघालो बघ भावा.....?
असं म्हणून सगळं खूप नियोजित झाल्याची खात्री करू लागला.....


रात्री झोपल्या नंतर पहाटे रात्री लवकर झोपलेली पोरं उठवायला आली आणि म्हणाली......
उठारय आम्ही जातोय परीक्षेला
तुम्ही या पुन्हा मागून......
दुसऱ्या सेकंदाला तर जाग आली आणि बघतो तर काय पोरं आंघोळीला पाणी आणाय बकेट घेऊन निघाले होते....
त्यांची पोझिशन पाहून
"" तुमच्या मायला लबाड तोंडाचे हो"" म्हणलो तशी पोरं आम्हाला फसवल्याच्या आनंदात हसू लागले.
जोशी आणि मी देवाच्या पाया पडून जाणार होतो तसेचं चालत आम्ही परीक्षेला जाणार होतो.
आमच्या रूमच्या बाकीच्या पोरांनी ऑटो केला होता.देवाच्या पाया पडून आम्ही srt कॉलेजच्या गेट जवळ धापा टाकत पोहोचतोय तोपर्यंत पोरं आशिक बनाया आपणे हे गाणं वाजवत आले आणि आमच्या सोबत बैठक क्रमांक शोधू लागले.
मराठवाड्यात ऊन जास्त असल्यामुळे सगळे आपल्या आपल्या सोयीने येऊन पेपर देऊन जाऊ लागले. शेवटच्या पेपरला सर्व सरांना भेटण्यासाठी काही मुलं गेली आम्ही पण गेलो.त्यावेळी मात्र थोड्या फार भेटी झाल्या......मग त्याच रात्री बांधलेली बोचकी,पेट्या रद्दी,अर्ध्या किमतीत विकण्यासाठी पुस्तकांचा गठ्ठा असा पसारा घेऊन अंबेजोगाई-परळी मुक्कामी गाडीने गावाकडं परतीचा प्रवास सुरु झाला.तिकिटं काढली की मनातला पहिल्या दिवसापासून कॉलेजमध्ये पहिला दिवस,कॅम्पला आलेली मज्जा,हातचं जेवणं, गावाकडची स्वप्नं, क्षमतेनुसार केलेला अभ्यास व गेलेल्या पेपरची मार्क....प्रियव्यक्तींनी लिहिलेली व हरवलेली वही  (स्लमबुक )
त्यावहिला गावाकडं निवांत वाचायचं म्हणून वाचायचं राहून गेलं शब्द-शब्द न्याहाळायचा होता...ती वही ही हरवली होती...अंबेजोगाई जवळच्या पोरांची गावं आणि तीन std नंबर वगळता माझ्याकडे आठवणींची काहीच शिदोरी शिल्लक नव्हती...
या सगळ्या विचारात आणि प्रवासातील मनाच्या प्रवासाने कधी गाव आलं ते कळलंच नाही.

पाहिले काही दिवस घरात पोरगं अभ्यासानं खराब झालीय हो?
त्याला काही काम सांगू नका हो?
जरा नंदयाला आराम करू द्या....हे थोडे दिवस चाललं....
आणि मग पुन्हा सुरू झाली कामाची वाटणी.....
गाई-म्हशी कोणी दिवसभर राखायच्या ?
बैल आणि नांगर कोण हानायचा ?
कोणाचं आमंत्रण असलं तर कोण जायचं?
आणि बाजारला कोण जायचं ?

अशी छोटी -मोठी काम बारावीच्या मराठीच्या कविता प्रेमाचा गुलकंद वगैरे म्हणून छान काम करू लागलो.निकालाची प्रतीक्षा होती.आणि अखेर तो दिवस उजाडला ४ जून.....

मोबाईलचा एवढा वापर नसल्यामुळे कॉलेजमध्ये लँड लाइन वर एक वाजता फोन करून निकाल मिळवायचा असा प्लॅन होता.पाच सहा रुपये गेले नंबर सांगण्यात अन ओळख पाठवण्यात पुन्हा शिपाई मामा "नंबर सापडलाय नंदू " असं म्हणायला आणि कॉइन संपायला एक झालं.....

शिकायला असताना चार-पाचशे महिन्याला मिळायचे पण आत्ता दहा रुपये सुद्धा विनाकारण मिळत नसतं. पुन्हा घरी जाऊन पाच रुपयांची नोट घेऊन आलो आणि पुन्हा फोन लावला..


शिपाई मामांचा आवाज आला..
"अरे तुला चौर्याहत्तर टक्के पडलेत बाळ"
आणि ते ऐकून थँक्स न म्हणता फोन ठेवला....

संध्याकाळी रामायण महाभारत झाल्यावर सकाळी गेल्यावर्षी ded ला लागलेल्या मुलाची मुलाखत घेतली.गेल्या वर्षीच्या एकोणेंशीला मेरिट क्लोज झाल्याचे कळाले...
..
मार्क शीट आणायला गेल्यावर समजलं प्रसन्न लागला त्याच्या आईने दिलेले दोन-तीन पेढे पण खाऊन आलो.तसेच वर्गातली सतरा मुलं-मुली चाळीस विद्यार्थ्यांपैकी लागल्याचं समजलं.